♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राज्यात लागू होणार ‘पीएमश्री योजना’ : मंत्रीमंडळाचा निर्णय

MH 28 News Live : कालच्या  मंत्रीमंडळ बैठकत केंद्र सरकारच्या पीएमश्री योजनेला महाराष्ट्रात लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात विविध निर्णय घेण्यात आले. यातील प्रमुख निर्णय म्हणजे केंद्राची पीएमश्री योजना महाराष्ट्रात राबविण्याचे यात ठरविण्यात आले. केंद्र सरकारने सप्टेंबर २०२२ रोजी योजनेची घोषणा केली आहे.

या अंतर्गत देशात १४ हजार ५९७ शाळा सुरू करण्यात येणार आहे. आता हीच योजना महाराष्ट्रातही राबविण्यात येणार आहे.राज्यातील शाळांच्या अद्यवतीकरणासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

या येजनेअंतर्गत शाळेतील नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ, ग्रंथालय अशा आधिनिक सोयी सुविधा अद्यावत करण्यात येणार आहेत. राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129