♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शिवराज्याभिषेकाच्या व्हाट्सएप स्टेटसवर आक्षेपार्ह काँमेंट करणाऱ्या तरुणाविरुध्द चिखली पोलीसांकडे फिर्याद, अमडापुरच्या अनवर काझीने दुखावल्या धार्मिक भावना…

MH 28 News Live, चिखली मागील काही काळापासून धार्मिक तणाव उत्पन्न करणाऱ्या घटना राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडत असताना चिखली शहरात देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस व्हाट्सअप ला ठेवल्याबद्दल अमरापूर येथील अन्वर काझी या युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेले भाषेमध्ये टिप्पणी करून अरुण यांच्या संदर्भ देत हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार रोहित विलास घोलप या युवकाने चिखली पोलीस ठाण्यात दि. ७ जून रोजी दाखल केली आहे.

यासंदर्भात थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे आहे की दि. २ जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र साजरा झाला, त्याबद्दल रोहित घोलप याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्याभिषेक सोहळ्याबाबत स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस पाहून अमडापूर येथील अनवर काझी या युवकाने रोहितच्या Whatsapp स्टेटसला ” Q Re baal tere baap ko bhul gaya kya ” असा मँसेज व “अरे शिवाजी महाराज बाद में आये रे बेटा ओरंगजेब पहीले तुम्हारे बाप है ना ” असा स्वरुपाची आक्षेपार्ह आँडीओ क्लीप त्याच्या आवाजात रेकॉर्ड करून पाठवली. हे दोन्ही रिप्लाय आल्यानंतर रोहीतने या घटनेची माहिती त्याच्या वडीलांना दिली. रोहित घोलप यांच्या वडील विलास घोलप हे त्यादिवशी टायफाईडच्या आजारामुळे दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेले असल्याकारणाने पोलिसांकडे फिर्याद देण्यासाठी चार दिवस विलंब झाला दिनांक सात जून रोजी या संदर्भातली रीतसर तक्रार रोहित विलास घोलप यांनी चिखली पोलीस ठाणे मध्ये दाखल केली असून पुढील चिखली पोलीस या तक्रारीवर काय कार्यवाही काय कारवाई करतात याची सर्वांना प्रतीक्षा आहे
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सदर घटनेतील आरोपी अनवर काझी आणि फिर्यादी रोहित घोलप हे दोघेही वर्गमित्र आहेत दोघेही अनुराधा फार्मसी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असल्याने दोघांचेही मोबाईल नंबर परस्परांजवळ आहेत त्यामुळे ते दोघे येथे परस्परांचे व्हाट्सअप स्टेटस नियमित पाहत असतात आणि याच संबंधांमधून हा प्रकार घडला असल्याचे माहिती मिळत आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129