
कल्याणकारी गायत्री मंत्र आणि त्यासंबंधीचे हे नियम व फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
MH 28 News Live : गायत्री मंत्र मानवाला लाभलेली दैवी देणगी आहे. गायत्री मंत्र पापनाशक, पुण्यवर्धक आहे. ह्या मंत्राच्या पठणाने बुद्धीला तेज येणे, स्मरणशक्ती वाढणे, बुद्धी सद्बुद्धी होणे, मेंदूचे विकार, विस्मरण, तोतरेपणा इत्यादी दोष दूर होण्यास मदत होते. हा मंत्र सर्वानीच तसेच शाळेकरी मुली- मुलांनी आवर्जून म्हटले पाहिजे.
गायत्री मंत्र
ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्
ह्या गायत्री मंत्राची देवता ही सूर्य असून त्या मंत्राचा अर्थ असा आहे.
गायत्री मंत्राचा अर्थ
स्वर्ग-मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांत व्यापून असणाऱ्या, श्रेष्ठ परमतत्व श्री सूर्य नारायणाचे आम्ही ध्यान करतो. हे सूर्यदेव आमच्या बुद्धीला श्रेष्ठता आणि उत्तम कर्म करण्यास प्रवृत्त करो.
गायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजे सत्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्याना दिसणारा सूर्यच समोर आणायचा असतो. तो आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देवो अशी प्रार्थना यामध्ये करायची असते.
लाभ उत्साह आणि सकारात्मकता वाढते, त्वचेच कांती येते, वाईट गोष्टींपासून मनाला मुक्ती मिळते, धर्म आणि सेवा कार्यात मन रमतं, पूर्वाभास होऊ लागतात, आशीर्वाद देण्याची शक्ती वाढते, स्वप्न सिद्धी प्राप्त होते, क्रोध शांत होतो.
गायत्री मंत्राचे काही नियम
गायत्री मंत्र सूर्यास्तानंतर म्हणू नये. मंत्र हे बाणासारखे असतात. मंत्रांचा उच्चार योग्य आणि स्वरांसहित असेल, तरच मंत्र म्हणण्याचा उद्देश साध्य होतो. मंत्रांचा चुकीचा उच्चार आणि त्यातून निर्माण झालेल्या अयोग्य स्पंदनांमुळे संबंधित व्यक्तीला त्रास होतो. सकाळच्या वेळी स्नान झाल्यावर मंत्रपठण केल्यास या मंत्राचा जास्त लाभ होतो.
सोयर आणि सूतक यांच्या कालावधीत मंत्रपठण करू नये.
मंत्रपठण करताना आहार आणि आचार यांचे नियम पाळणे आवश्यक आहे.
गायत्री मंत्राची शक्ती
या मंत्रात इतकी शक्ती आहे की केवळ तीनदा देखील या मंत्राचा जप केल्यास नकारात्मकता किंवा भूत-प्रेताची बाधा जवळपास भरकटतं नाही. गायत्री सद्बुद्धीचं मंत्र आहे, म्हणून या मंत्रांचा मुकुटमणी असे देखील म्हटले गेले आहे. नियमित १०८ वेळा गायत्री मंत्र जप केल्याने बुद्धि प्रखर आणि कोणताही विषय अधिक काळ स्मरण ठेवण्याची क्षमता वाढते.



