♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीकरांना तात्काळ शुद्ध पाणीपुरवठा करावा – संभाजी ब्रिगेडचे निवेदन

MH 28 News Live, चिखली : नगर परिषदच्या वतीने शहरातील नागरिकांना दूषित व पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे प्रमाण वाढत आहे. पेनटाकळी प्रकल्पात पुरेसा पाणी साठा असतांना देखील चिखली नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे चिखलीकरांना आठ दहा दिवसातून एकदाच पाणी पुरवठा सुरू असून तो देखील पिवळ्या व उग्र वास असलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या येत असून शहरातील उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता आठ दिवस पाणी पुरवणे नागरिकांना शक्य नसल्याने आठवड्यातून दोन दिवस तरी सुरळीत व शुद्ध पाणी पुरवठा व्हायला हवा अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली. या संदर्भात दि. ३ जून रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

नगर पालिकेच्या नळाद्वारे दुषित पाणी पुरवठा होत असल्याने साथीचे रोग फैलावत आहेत. त्यामुळे तात्काळ पाणीपुरवठा विभागाने योग्य ती जलशुद्धीकरण प्रक्रिया करून चिखलीकरांना शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी या निवेदनात केली आहे. या समस्येवर वेळीस उपाययोजना न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष विकास खंडागळे, चिखली विधानसभा अध्यक्ष शिवश्री आकाश लंबे, जिल्हा उपाध्यक्ष श्रावण भुसारी, माजी तालुका अध्यक्ष निलेश मोरे, माजी शहर अध्यक्ष गणेश देशमुख, तालुका अध्यक्ष योगेश खेडेकर, शहर अध्यक्ष गोपाल सुपेकर, शहर संघटक मंगेश भोलवणकर, शहर अध्यक्ष का. आ. सागर महाशब्दे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129