
रावसाहेब दानवे यांच्याकडे झारखंडमधील या लोकसभा विजयाची जबाबदारी
MH 28 News Live : ग्रामीण राजकारणाची जाण असलेले व जनतेची नाडी ओळखणारे निवडणूक तंत्रातील कुशल रणनीतीकार म्हणून केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर पक्षाने आणखी एक महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे. झारखंडमधील सिंहभूम, चाईबासा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून दानवे यांचेकडे पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. या नव्या दायित्वामुळे ना. दानवे यांचे पक्षातील वजन आणखी वाढणार असून त्याच्या अनुभवसिद्ध निवडणूक व्युहनीतीचा पक्षाला देखील लाभ होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा हे काल आणि आज झारखंड राज्याच्या दौऱ्यावर होते. झारखंड राज्यातील सिंहभूम, चाईबासा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचेकडे पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. त्यादृष्टीने त्यांचे अनेक दौरे झाले असून, दर महिन्याला प्रत्यक्ष किंवा आँनलाईन व्हिसी माध्यमातून भाजप पदाधिकाऱ्यांशी ते संपर्कात आसतात.
आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या झारखंडमधील चाईबासा येथे झालेल्या विजय संकल्प महारॅलीमध्ये शहांनी “मेरे मित्र, हमारे मंत्रीमंडळ के साथी श्री रावसाहेब दानवे अशी ओळख करुन देत” या लोकसभेच्या विजयाची जबाबदारी रावसाहेब दानवे यांनी घेतली असल्याचे आवर्जून सांगितले. उपस्थित जनसमुदाने यावेळी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करत दानवे यांचे स्वागत केले.
विजय संकल्प महारैलीच्या नियोजनात सुक्ष्म नियोजन करणारे रावसाहेब दानवे यांनी पूर्वसंध्येला कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. रात्री उशिरा पर्यंत थांबून तयारी पुर्ण करुनच झोपायला गेले व पहाटेच तेथे सर्वात आधी हजर होऊन तेथिल पदाधिकाऱ्यांना मोठा धक्काच दिला. या वेळी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी दानवे यांच्या प्रचंड कार्यक्षमतेबद्दल कुतूहल व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनात सिंहभूम, चाईबासा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button