
नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला चौथ्याच दिवशी मिळाली ४ लाख रुपयांची सरकारी मदत; आ. श्वेताताई महाले यांनी सोपवला धनादेश
MH 28 News Live, चिखली : तालुक्यातील भालगाव येथे चार दिवसांपूर्वी सोसाट्याचा वारा व पावसामुळे कोसळून पडलेल्या झाडाखाली एका शेतकऱ्याचा करून अंत झाला. या शेतकऱ्याच्या पत्नीला चौथ्या दिवशी सर्व शासकीय कागदपत्रांची व नियमांची पूर्तता करून चार लाख रुपयांची मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश दि. ४ मे रोजी आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते तहसील कार्यालयामध्ये देण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार सुरेश कव्हळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील भालगाव येथे ३० एप्रिल रोजी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. येथील ज्ञानबा श्रीपत चव्हाण हे बकऱ्या चारण्यासाठी गेले असता पावसात त्यांनी आंब्याच्या झाडाचा आसरा घेतला. पण अचानक ते झाड त्यांच्या अंगावर कोसळले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आज ४ मे रोजी त्यांच्या पत्नी शांताबाई चव्हाण यांना आश्वस्त केल्यानुसार नैसर्गिक आपत्ती निधीतून ४ लक्ष रुपयांचा धनादेश आ. श्वेताताई महाले यांनी आर्थिक मदत म्हणून सुपूर्द केला.
या वेळी तहसीलदार सुरेश कव्हळे, डॉ. प्रतापसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष भाजप, कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष, पंडितराव देशमुख शहराध्यक्ष, अशोक पाटील, सरपंच गणेश परिहार, तलाठी काळे, गजनान परिहार, धनंजय भगत, समाधान चव्हाण, मनोहर चव्हाण, दिलीप परिहार, अजाबराव लोंढे, गजेंद्र भगत, रमेश डुकरे, अंबादास, राजेंद्र गवई, शिवाजी चव्हाण, गणेश भगत, स्वप्नील पडघान आदी उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button