♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सामाजिक अशांतता निर्माण करून विकास कामाला खिळ घालणाऱ्यांना बळी पडू नका – आ. श्वेताताई महाले अमानुष लाठीचार्जचा केला निषेध

MH 28 News Live, चिखली : सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन विकास साधणन्याचे आपले ध्येय आहे. चिखली शहरासाठी अनेक योजना मंजूर करून कोट्यवधी रुपयांचा निधी आपण आणत आहोत मात्र, यामुळे काही असामाजिक प्रवृत्तीच्या पोटात भितीचा गोळा उठला असून त्यांना राजकीय असुरक्षितता जाणवत आहे, याच असुरक्षिततेतून त्यांनी सैलानीनगर व सदानंद नगर परिसरामध्ये हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून चालवला आहे, मात्र या प्रयत्नांना सर्वसामान्य लोकांनी मुळीच प्रतिसाद देऊ नये व सामाजिक एकोपा कायम राखून विकासकामात सहकार्य करावे असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले आहे. दरम्यान विलास घोलप व अन्य कार्यकर्त्यांवर दंगा काबू पथकाने केलेल्या अमानुष लाठीचार्जचा आ. श्वेताताई महाले यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

सदानंद नगर येथे काल दिनांक १६ मे रोजी एका लग्न समारंभावर काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीमुळे तत्कालीन निर्माण झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी गेलेले शिवसेनेचे शहर प्रमुख विलास घोलप यांच्यावर राज्य राखीव पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी अमानुष लाढीमार केला, यामध्ये जखमी झालेल्या घोलप यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आ. महाले यांनी दि. १७ मे रोजी जवंजाळ हॉस्पिटलमध्ये जाऊन घोलप यांची भेट घेतली. दंगा काबू पथकाने घोलप व अन्य कार्यकर्त्यांवर केलेली अमानुष लाठीमाराचा आ. महाले यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. याप्रसंगी मेहकर येथील आमदार डॉ. संजय रायमुलकर हे देखील उपस्थित होते. यावेळी आ. श्वेताताई महाले यांनी सदर प्रकरणी आपली प्रतिक्रिया स्पष्ट शब्दात व्यक्त केली.

सदानंद नगरची पाणी समस्या मार्गी लागली, लवकर काम सुरू होणार – आ. महाले

सदानंद नगर या भागातील रहिवाशांच्या आता चिखली नगरपालिका हद्दीमध्ये समावेश झाला असून त्यांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी, बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आपण शासनाच्या प्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत तसेच भरघोस निधी देखील या कामांसाठी आपण उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती आ. श्वेताताई महाले यांनी या संदर्भात दिली. स्थानिक नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या आपण मार्गी लावली असून प्रत्यक्ष कामाला देखील लवकरच सुरुवात होणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे अशा माथी भडकवणाऱ्या लोकांच्या कुठल्याही प्रयत्नांना बळी न पडतात स्थानिक जनतेने शांतता राखावी आणि विकास कार्यामध्ये सहकार्य करावे असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129