
तलाठी, मंडळ अधिकारी बदली प्रक्रिया शासन निर्णयानुसार करा – मनसेची मागणी
MH 28 News Live, चिखली : महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीचे विनियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार तसेच एप्रिल 2018 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय नुसार नीपक्ष व सेवाजेष्ठतेनुसार बदली प्रक्रिया राबवावी अशी मागणी मनसेच्या शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत सविस्तर असे की महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 नुसार शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना एका पदावरील कामकाजाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांनी सर्वसाधारण बदली करण्यात येते. या उद्देशाने नागरी सेवा मंडळाने पदस्थापने संदर्भात शिफारसी करताना समुपदेशाने कारवाई करण्याकरता मार्गदर्शक तत्वे तसेच 9 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयानुसार समुपदेशनाद्वारे बदलीचे धोरण निश्चित करण्यात आले असून सदर धोरणानुसारच बदली प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली. सदरच्या बदली प्रक्रियेमध्ये जर नियमानुसार कारवाई झाली नाही किंवा विनंती बदल्या ह्या नियम व निकषांचे उल्लंघन करून केल्या गेली तर सदरच्या नागरिक सेवा मंडळ सह जिल्हाधिकारी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर यांच्यासह , मनविसे जिल्हाध्यक्ष शैलेश कापसे,मनसे शहर अध्यक्ष चिखली नारायणबापु देशमुख उपतालुका अध्यक्ष विजय पडोळ, मनाविसे तालुका अध्यक्ष स्वप्निल आसोले, तालुका सचिव प्रवीण देशमुख, शहर सचिव अजय खरपास, तालुका उपाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button