मराठा आरक्षण विधेयकावर श्वेताताई म्हणाल्या…
चिखली : राज्यातील बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाची आर्थिक व शैक्षणिक प्रगती व्हावी, या समाजातील मागासलेपण दूर व्हावे याकरिता महायुतीच्या सरकारमध्ये जे ठोस प्रयत्न झाले ते मराठा समाजाच्या दृष्टीने अतिशय आश्वासक राहिले आहेत. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळवून दिले होते. मात्र त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने नाकर्तेपणा करून ते घालवले. आता देखील महायुतीच्याच सरकारने मराठा समाजाला १० टक्के शैक्षणिक व आर्थिक आरक्षण दिले आहे, हे आरक्षण कोर्टात टिकेल असा मला विश्वास वाटतो. मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय दिल्याबद्दल व समाजाचे मागासलेपण दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेऊन ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा अजितदादा पवार यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते ” अशा शब्दात आ. श्वेताताई महाले यांनी आजच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
परंपरेने गावगाड्यातील थोरला भाऊ म्हणून मराठा समाजाची भूमिका आजवर सर्व जाती धर्मीयांना सोबत घेण्याची व अडीअडचणीमध्ये धावून जाण्याचे राहिली आहे. मात्र, आज या समाजाची अवस्था मागासलेपणाची झाल्यामुळे वर्तमान परिस्थितीत आरक्षणाची आवश्यकता निर्माण झाली. अभ्यासात हुशार असलेल्या अनेक मराठा तरुणांनी मोठ्या संख्येने एमपीएससी, यूपीएससी व स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न केले. त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले, मात्र आरक्षणाच्या अभावी नोकरीपासून ते वंचित राहिले व पर्यायाने या हुशार मराठा तरुणांचे नुकसान होत गेले. परंतु, आता या तरुणांना निश्चितच न्याय मिळेल व राज्य महायुतीच्या सरकारने घेतलेल्या दहा टक्के आरक्षणामुळे आरक्षणाचे निर्णयामुळे त्यांना नोकरीचा लाभ होऊन त्यांच्या कुटुंबांची आर्थिक प्रगती होईल आणि मराठा समाजातील गरीब कुटुंब आपली प्रगती साधू शकतील असा मला विश्वास वाटतो. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून घालून दिलेल्या मौलिक तत्वांचे पालन हे आरक्षण देताना राज्य सरकारने केले आहे. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानुसारच इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता व त्यांच्या भावना न दुखावता महायुती सरकारने हे १० टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. हे आरक्षण चिरकाल टिकेल तसेच यातून मराठा समाजाची शैक्षणिक व आर्थिक प्रगती होईल असा विश्वासही आ. श्वेताताई महाले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल व्यक्त केला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button