
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार देशाला मार्गदर्शक – आ. श्वेताताई महाले समर्थ भारत केंद्रातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे झाले आयोजन
MH 28 News Live / चिखली : शत्रूच्या उरात धडकी भरवेल असे शस्त्र सामर्थ्य संपादन केलेले राष्ट्रच आपले संरक्षण आणि संस्कृतीचे संवर्धन करू शकते हा प्रेरणादायी विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला दिला व हाच विषय विचार देशाला आज मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. समर्थ भारत केंद्रातर्फे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, प्रखर विज्ञानवादी, कर्ते सुधारक, ओजस्वी वक्ते, सिद्धहस्त साहित्यिक व दृष्टे हिंदू संघटक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले भारतमातेचे थोर सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त दि. २८ मे रोजी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये समर्थ भारत केंद्राच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले होते या प्रसंगी आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रा. स्व. संघाचे पूर्व तालुका संघचालक अरविंदराव असोलकर, समरसता साहित्य परिषदेचे, निळूभाऊ चौधरी, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, चिखली ब्राह्मण सभेचे अध्यक्ष रमेशराव सराफ, भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित, माजी शहराध्यक्ष सुरेंद्रप्रसाद पांडे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, रवींद फोलाने, पवन लढ्ढा, डॉ. किशोर वळसे आदी मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
समर्थ भारत केंद्राचे प्रवर्तक रेणुकादास मुळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले. रामभाऊ देशपांडे, नितीन महाजन, किरण पिंपरकर, सुधीर कुळकर्णी, अमोल खेकाळे, रवींद्र सुरंगलीकर, भगवान निंबाळकर, गोपाल नकवाल, नारायण भवर, विजय नकवाल, प्रदीप भवर, वृषभ देशपांडे, प्रशांत जोशी, सतीश बिडकर, विष्णू कुडके, प्रकाश कुळकर्णी, शैलेश बाहेती, चेतन देशमुख, सुभाषआप्पा झगडे, दीपक कुळकर्णी, भगवानराव चोपडे, अजय कोठारी, सुधीर तांबट, जतीश मुळे, शंकर उद्रकर, वीरेंद्र वानखेडे, सत्यनारायण लढ्ढा, महेश लोणकर, शैलेश देशमुख, अमोल शेटे, सागर खरात, विजय वाळेकर, सुदर्शन खरात, रघुनाथ पवळ, सुरेश गंडे, विजय जोशी यांच्यासह सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.