♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

महत्त्वाची बातमी – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्याची पध्दत झाली आणखी सोपी; राज्य सरकारने घेतला हा निर्णय

  • MH 28 News Live, चिखली : राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तात्काळ अर्ज सादर करता यावेत यासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती अधिक सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार या कक्षाचे काम जास्तीत जास्त गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार या कक्षाचे अॅप्लिकेशन आणि टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी वैद्यकीय समितीची बैठक आज मंत्रालयात पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे उपस्थित होते. या बैठकीत खारगे यांनी कक्षाचा कामाचा आढावा घेतला आणि कामकाजाबाबत काही सूचना दिल्या.

निधी कक्षाचे प्रमुख चिवटे यांनी बैठकीत सांगितले की, ऑनलाईन एप्लिकेशन तसेच वेबसाईट द्वारे रुग्णांचे अर्ज तत्काळ उपलब्ध होणारी यंत्रणा तयार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे मोबाईल अॅप्लीकेशन तसेच मदत व मार्गदर्शनासाठी टोल फ्री नंबर लवकरच सुरु करण्यात येईल. तसेच योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व शासकीय जिल्हा रूग्णालयांचे शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठता यांनी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय सहाय्यता निधीमधील रुग्णालयांची संख्या वाढविणार

राज्यातील जास्तीत जास्त रुग्णांना सहाय्यता उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये जास्तीत जास्त रुग्णालयांचा समावेश (पॅनल) करण्यात येणार आहेत. याकरीता रूग्णालयाने अर्ज सादर करावे यासाठी रूग्णालयांना प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच रुग्णांलयांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांच्या पर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवली जाणार आहे. राज्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष पोहचवा असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे चिवटे यांनी सांगितले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129