♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

उध्दव ठाकरेंच्या सभेच्या निमित्ताने शिवसेनेत आले पुन्हा नवचैतन्य, चिखलीत शिंदे गटाचे पाय आणखी खोलात

MH 28 News Live, चिखली : जून महिन्यात शिवसेनेत पडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर खरे तर महाराष्ट्राच्या राजकारणालाच कलाटणी मिळाली. परंतु, या बंडाळीचा खोलवर परिणाम शिवसेनेवर झाला. गावोगावी दोन गट पडले. चिखली शहरात देखील ठाकरे गट आणि शिंदे गट अशी दोन शकले पडली. मात्र, इथे सुरुवातीपासूनच ठाकरे गटाचे पारडे जड राहिले. जुने आणि नवे असे बहुसंख्य शिवसैनिक आजही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या झेंड्याखाली एकवटलेले दिसतात. त्या तुलनेने बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे शहरात नाममात्र अस्तित्व आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उद्या माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘ शेतकरी संवाद मेळावा ‘ या नावाने जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेच्या माध्यमातून स्थानिक शिवसैनिक पुन्हा एकदा सक्रिय झाले असून या निमित्ताने पक्षात नवचैतन्य संचारल्याचे दिसत असून याउलट शिंदे गटाचा पाय चिखली शहरात आणखीनच खोलात गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौर्याची सुरुवात चिखली येथील उद्याच्या शेतकरी संवाद मेळाव्याने होत असल्याने या सभेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षातील उभ्या फुटीनंतर गेल्या पाच महिन्यात दोन्ही गटांमध्ये अनेक छोट्या मोठ्या चकमकी झडल्या मात्र उद्याच्या सभेतून थेट लढाईला तोंड फुटणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या सोबत गेलेले आमदार व खासदार यांच्या मतदारसंघात उतरून आता उध्दव ठाकरे हे स्वतः वार करणार आहेत. राज्यात होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका आणि नगर पालिका निवडणुकांच्या पूर्वी शिंदे गट आणि सध्याच्या सरकार विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा जोरदार प्रयत्न उध्दव ठाकरे व त्यांच्या नेतृत्वातील पक्ष करणार असून त्यांचे पहिले लक्ष्य आजवर निष्क्रिय खासदार म्हणून नावाजलेले प्रतापराव जाधव हे असतील. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ठाकरे गटाने या सभेची जय्यत तयारी चालवली असून संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उद्या चिखलीत पोहचत आहेत.

या पार्श्वभूमीवर चिखली मतदारसंघातील व शहरातील परिस्थितीचे आकलन केल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात नवा उत्साह आणि जोश संचारल्याचे स्पष्ट दिसते. या जोरदार वातावरण निर्मिती समोर आधीच अशक्त असलेल्या शिंदे गटाचे अस्तित्व अगदीच झाकोळून गेले आहे. उद्याच्या सभेनंतर चिखली मतदारसंघात आणि शहरात खा. जाधव यांच्या समर्थकांची संख्या आणखीच रोडावणार असल्याची चर्चा असून सध्या असलेले आपले नाममात्र अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान शिंदे गटासमोर उभे राहणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129