♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली येथे मनसेने लावले महामार्गावर छ.संभाजी नगरचे नामफलक

MH 28 News Live, चिखली : गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर नावं करण्याची मागणी संपूर्ण राज्यभर होत होती. दरम्यान अखेर केंद्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्याच्या निर्णयाला परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही राष्ट्रीय महामार्गावरील नाम दर्शक फलकांवर औरंगाबाद हे नाव कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने दिनांक 25 मार्च 2023 रोजी चिखली येथे खामगाव जालना राष्ट्रीय महामार्गावरील फलकावर असलेल्या औरंगाबादच्या नावावर काळीमा फासून छत्रपती संभाजीनगरचे नामांतर फलक लावण्यात आले.

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्याने सर्व शासकीय कार्यालय , बस स्थानक यावर छत्रपती संभाजी नगर नाम फलक लावण्यात येत आहे. मात्र राज्य महामार्गावरील फलक अद्याप जशास तसे असल्यामुळे मनसेच्या वतीने राज्य महामार्ग अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविण्यात आला. येत्या 8 दिवसात महामार्गावरील प्रत्येक नाम दर्शक फलकावर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर हे नामफलक तात्काळ लावण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्य महामार्ग विभागा विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी दिला।

त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथे F.M रेडिओवर असलेले निवेदक अद्यापही छत्रपती संभाजी नगर शहाराचा उल्लेख औरंगाबाद असाच करतात. त्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्या रेडिओ वर छत्रपती संभाजी नगर असा उल्लेख करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, तालुकाध्यक्ष विनोद खरपास, मन विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मन शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, शहरअध्यक्ष नारायण बापू देशमुख, उपशहर अध्यक्ष रवी वानखेडे, शहर सचिव अजय खरपास, उप तालुकाध्यक्ष प्रेम पडघान, उप तालुकाध्यक्ष मयूर पऱ्हाड, मन विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष स्वप्निल आसोले, मन शेतकरी सेना तालुकाध्यक्ष अरुण येवले, विभाग अध्यक्ष समाधान म्हस्के, विभाग अध्यक्ष पंढरी मैंद, विभाग अध्यक्ष बंटी कळमकर, विभाग अध्यक्ष निशांत गायकवाड, मन विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अंकित इंगळे, शाखाध्यक्ष अमोल वानखेडे, सिद्धार्थ खंडारे, वैभव वानखेडे, सूर्यकांत खरात, शुभम चव्हाण, अजय देशमाने, मोहन मेहेत्रे, सुनील ठेंग यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129