… तर डायरेक्ट बसच्या काचा फोडणार, चिखलीत मनसेचा इशार
MH 28 News Live, चिखली : केंद्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्याच्या निर्णयाला परवानगी दिली आहे. सर्व ठिकाणी छत्रपती संभाजी नगरचे नाम फलक लावल्या जात असून अद्यापही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या काही एसटी बसवर मुद्दाम औरंगाबाद असा नाम उल्लेख केला जात असल्याचे पडसाद चिखली येथे उमटले.
मनसे शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख १४ एप्रिल रोजी चिखली बस स्थानक येथे गेले असता अकोला – कल्याण जाणाऱ्या एसटी बसवर औरंगाबाद मार्गे असा नाम उल्लेख केल्याचा आढळून आला औरंगाबाद असे नाव दिसता क्षणीच शहराध्यक्ष देशमुख यांनी बस चालक वाहक व अधिकाऱ्यांना चांगल्या भाषेत खडसावले यानंतर परत एसटी बसवर औरंगाबाद नाव दिसल्यास डायरेक्ट एसटी बसच्या काचा फोडणार असा अंतिम इशारा त्यांनी दिला व एसटीवर असलेले औरंगाबाद नाव स्वतः खोडून टाकले. त्यावेळी मनसे शहराध्यक्ष नारायण बापू देशमुख, उपशहराध्यक्ष रवि वानखेडे यांसह संजय पैठणकर, विभाग अध्यक्ष मंगेश उगले, निशांत गायकवाड, जितेंद्र इंगळे, शेख युसुफ, साहेबराव परिहार यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button