♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

वैरागडचे सह्याद्री कृषी पर्यटन ठरले पुरस्काराचे मानकरी… जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून कृषी पर्यटन यांना पुरस्कार प्रदान

MH 28 News Live, चिखली : 16 मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात नांदत असलेल्या कृषी पर्यटन संस्कृतीचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन ही संकल्पना अस्तित्वात आणून शेती सोबतच स्थानिक ग्रामीण संस्कृतीला व्यावसायात रूपांतरित केला आहे.

शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकवलेल्या मालाला शेतातच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी पर्यटन हा समर्थ पर्याय म्हणून पुढे येत आहे. यात महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्था कृषी पर्यटन आणि पर्यटन चळवळीला महत्त्व प्रदान करून देण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. विदर्भ हा शेती आणि पर्यटन दृष्ट्या मागासलेला प्रदेश असला तरी सुद्धा विदर्भामध्ये कृषी पर्यटन ही संकल्पना ताकतीने रुजत आहे आणि यशस्वीरित्या चालत आहे. स्मार्ट वेल्फेअर फाउंडेशन आणि विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (वेद) कौन्सिल या संस्था अंतर्गत जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त उत्कृष्ट काम केलेल्या विदर्भातील पाच कृषी पर्यटनांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात बुलढाणा जिल्ह्यातील सह्याद्री कृषी पर्यटन वैरागड यांना सुद्धा पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्कारांमध्ये आनंद मळा ऍग्रो टुरिझम, ठाकूरवाडी ऍग्रो टुरिझम, अरण्य फार्म ऍग्रो टुरिझम आणि पळसबाग ऍग्रो टुरिझम या सह सह्याद्री कृषी पर्यटन केंद्र यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा श्रीमती रुपादेवी डागा वेद कौन्सिल हॉल नागपूर येथे पार पडला.

यावेळी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे उपसंचालक श्री सवाई सर यांच्यासोबत स्मार्ट वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज महाजन व सचिव मेमन,वेद कौन्सिलचे पदाधिकारी, नागपूर जिल्हा कृषी अधीक्षक श्री.रविंद्र मनोहरे , सहाय्यक वन संरक्षक निलेश गावंडे, गव्हरमेंट पॉलीटेक्निकच्या टूर्स अँड टुरिझम विभागाचे प्रमुख प्रशांत विरखरे, एलएडी कॉलेजच्या सहाय्यक अध्यापिका प्रचिती बगाडे व दोन्ही संस्थांचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमची सुरवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली ठाकरे यांनी तर आभारप्रदर्शन संजय मेमन यांनी केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129