शेलसूर येथील अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
MH 28 News Live, चिखली ( चंद्रशेखर काळे ) तालुक्यातील शेलसूर येथील नारायण विश्वनाथ भोरडे ( ५२ ) हे शेतकरी कामानिमित्त शेतात जात असताना दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात जात असताना रस्त्यातच डबा धरून बसलेल्या एका अस्वलाने हल्ला केला. हल्ल्यामध्ये नारायण भोरडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शेलसूर येथील योगिराज क्लिनिकचे डॉ. पंकज काळे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना बुलढाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय पाठवण्यात आले. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तालुक्यातील शेलसूर, धोडप, पळसखेड सपकाळ, डोंगर शेवली, करवंड या परिसराला लागून ज्ञानगंगा अभयारण्य असल्यामुळे परिसरामध्ये अस्वलांचा तसेच जंगली जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात असून अशा घटना या परिसरामध्ये नेहमीच घडत असतात या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. या भागात याआधी सुद्धा आस्वालांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत, त्यामुळे वन विभागाने आस्वालांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button