
उदयनगर करत आहे बस स्थानकाची प्रतीक्षा, नागरिकांची होत आहे कुचंबना
MH 28 News Live, उदयनगर : येथील बस थांब्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांची खूपच गैरसोय होत आहे. प्रवाशांना मार्गावरच उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे.
उदनगर परिसराला लागून २० ते २५ खेडी आहेत. या गावातील प्रवाशांना काही कामानिमित्त चिखली, खामगाव, बुलडाणा आदी ठिकाणी जायचे झाल्यास उदयनगर बस थांब्यावरूनच ये-जा करावी लागते. परंतु, येथे प्रवाश्यांसाठी प्रवाशी निवारा नसल्याने प्रवाशांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.
एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी बरेचवेळा येऊन पाहणी केली. शहरासह ग्रामीण भागात प्रत्येक बस थांब्यावर प्रवासी निवारा आहे उदयनगर थांब्यावर औरंगाबाद – नागपूर बुलढाणा – अकोला अशी चौफुली असून प्रवासी निवा याची आवश्यकता आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन प्रवाशांच्या सेवेसाठी उदयनगर थाब्यावर प्रवासी निवारा उभारावा, अशी मागणी परिसरातील प्रवासी वर्गाकडून होत आहे.
एसटी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू असून येथील थांब्यावरून २४ तासात जवळपास एसटीच्या दोन अडीचशे बसेस धावतात. यामुळे एसटी महामंडळाला उत्पन्नही चांगले मिळते. परंतु, एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुखसोयींकडे मात्र दुर्लक्ष केल्या जात आहे. लहान मुले महिला भगिनी आदींना बाहेरगावी जायचे झाल्यास येथील थांब्यावरूनच प्रवास करावा लागतो त्यामुळे येथे लवकरात लवकर बस स्थानक बांधण्यात यावे अशी मागणी गावकरी करत आहेत.