♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आ. श्वेताताई महाले पाटील यांची कार्यतत्परता; काल सोडवले शेतकऱ्यांचे उपोषण अन् आज कृषी मंत्र्यांकडे केली पीकविम्यातील तफावतीची रक्कम देण्याची मागणी

MH 28 News Live, चिखली : शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण असलेल्या व मतदारसंघातील प्रश्नांचा उच्चस्तरावर विनाविलंब पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून आ. श्वेताताई महाले पाटील यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आ. श्वेताताई महाले यांच्या याच धडक कार्यशैलीचा प्रत्यय आज पुन्हा आला. तालुक्यातील एकलरा येथील शेतकरी गेल्या आठ दिवसापासून पीकविम्याच्या तफावतीची रक्कम शासनाकडून मिळावी यासाठी उपोषण करत होते. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते हे उपोषण सुटले. मात्र, केवळ उपोषण सोडवून आ. महाले थांबल्या नाहीत; तर हा प्रश्न लगोलग निकाली काढण्याच्या कामास लागल्या. मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना यासंदर्भात निवेदन सादर करून आ. श्वेताताई महाले पाटील यांनी पीक विम्याच्या तफावतीची रक्कम देण्याची मागणी यावेळी केली.

बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यातील २०२२ – २३ या खरीप हंगामामध्ये एकूण ५० हजार २२८ शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडे विमा काढला होता. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत २५ हजार ३८२ व काढणे पश्चात नुकसानीमध्ये २२ हजार ७३ असे एकूण ४७ हजार ४५५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी (Online Intimation) भारतीय कृषी विमा कंपनी कडे दाखल केल्या. स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे २५ हजार ३८२ ऑनलाइन तक्रारी पैकी १७ हजार ४४९ शेतकऱ्यांना रुपये १४. २१ कोटी व काढणीपश्चात नुकसानीचे २२ हजार ७३ पैकी ६८६६ शेतकऱ्यांना रुपये १६ . १९ कोटी असे एकूण २४ हजार ३१५ शेतकऱ्यांना रुपये ३०. ४० कोटी नुकसान भरपाई कंपनीने दिली आहे.
चिखली तालुक्यात एकलारा व जांभरून या गावांमध्ये देखील शेतकऱ्यांनी विमा काढला होता. एकाच मंडळात एकाच वेळी लागून असलेल्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त गत गटात झालेल्या नुकसानीची एकाच वेळेत काढणी पश्चात नुकसानीची एकाच वेळी तक्रार करूनही काही शेतकऱ्यांना अत्यल्प तर काही शेतकऱ्यांना जास्त रक्कम नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे याकडे आ. श्वेताताई महाले पाटील यांनी आपल्या निवेदनातून लक्ष वेधले.

अशी निर्माण झाली पीकविम्याच्या रकमेत तफावत

एकलरा मंडळातील सुधाकर तोताराम अंभोरे यांचे गट क्र. ५०० पीक १.४१ तर नामदेव लिंबाजी अंभोरे यांच्या गट क्र. ११२ मधील १.३ हेक्टरमधील सोयाबिन पिकांचे काढणी पश्र्चात अनुक्रमे १०/१० ते १२/ १० / २०२३दरम्यान नुकसान झाल्याने त्यांनी ११/१० व १४/१०/ २०२३ रोजी ऑनलाईन तक्रार केली वरील दोन्ही शेतकऱ्यांना अनुक्रमे ४७,१७५ व ५३,७२५ प्रति हेक्टर प्रमाणे ६६,५१७ आणि ६८, ५४३एव्हढी रक्कम मिळाली आहे.
तर शोभा वसंतराव अंभोरे यांच्या गट क्रमांक ५०१ मधील शेतात सोयाबीन पिकाचे १.८ हेक्टर विमा संरक्षित केले होते . दि ६/१०/२०२२ रोजी त्यांच्या सोयाबिन पिकांचेकाढणी पश्चात नुकसान झाले. त्यांनी दि ९/१०/२०२२ रोजी ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्यांना प्रति हेक्टर ४१६३ रूपये प्रमाणे ७४९३ एव्हढी अत्यल्प रक्कम मिळाली. म्हणजेच
शोभा तोताराम अंभोरे यांना सुधाकर तोताराम अंभोरे यांच्या पेक्षा ४३०१२ तर नामदेव लिंबाजी अंभोरे यांच्यापेक्षा ४८, ५६२ रूपये कमी मिळाले. तसेच सुधाकर तोताराम अंभोरे यांच्या क्षेत्राचा विचार केल्यास नामदेव लिंबाजी अंभोरे यांच्यापेक्षा ५५०० कमी रक्कम मिळाली आहे. त्यामुळे एकाच गावात एकाच वेळी सारखे नुकसान होउन सारखाच पंचनामे होउन देखील नुकसान भरपाई देताना मात्र भेदभाव करण्यात आला आहे.

आ. श्वेताताई महाले पाटील यांनी केली शेतकऱ्यांसाठी आग्रही मागणी

चिखली तालुक्यातील अद्याप स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे ७९३३ व काढणीपश्चात नुकसानीचे १५ हजार २०७ असे एकूण २३ हजार १४० शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामध्ये १२७२ शेतकरी असे आहेत ज्यांना रुपये १००० च्या आत कमी दर्शविलेली आहे. पीक विमा नुकसान भरपाई देतेवेळी किमान एक हजाराच्या वर नुकसान भरपाई द्यावी असा नियम आहे. असे असताना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई देताना एक हजाराच्या आत रक्कम देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची तफावत रक्कम काढून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ज्या शेतकऱ्यांना १००० च्या आत रक्कम दर्शवली त्यांना १००० पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त ची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशी आग्रही मागणी आ. श्वेताताई महाले पाटील यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129