
Breaking News प्रदेशाध्यक्षांच्या गृह जिल्ह्यात काँग्रेसला जबर धक्का ! माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा पक्ष सदसत्वाचा राजीनामा. १२ जून रोजी बांधणार हातावर घड्याळ ?
MH 28 News Live / खामगाव : काँग्रेसच्या वतीने सलग तीन टर्म आमदार राहिलेले खामगाव मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. ३१ मे रोजी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व पदांवरून आणि सदस्यत्वावरून राजीनामा दिला असून, आज त्यांनी अधिकृतपणे याची माहिती माध्यमांना दिली. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला स्वतःच्या प्रदेशाध्यक्षांच्या गृह जिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. येत्या १२ जून रोजी दिलीप कुमार सानंदा हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सानंदा हे गेली चार दशके काँग्रेसच्या कार्यात सक्रीय होते. पक्षनिष्ठा राखून त्यांनी संघटन बळकट करण्यासाठी तन-मन-धनाने योगदान दिले होते. पक्षानेही त्यांना विविध जबाबदाऱ्या देऊन गौरवले होते, असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.
मात्र, गेल्या काही काळात पक्षातील अंतर्गत गटबाजी, दुर्लक्ष आणि अनुशासनहीनतेमुळे सानंदा नाराज होते. विशेषतः २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी कारवाया करून भाजपच्या उमेदवाराला मदत केली. या व्यक्तींनाच २६ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या सद्भावना संकल्प सभेची जबाबदारी देण्यात आली. खामगाव शहर काँग्रेसच्या अध्यक्षा सरस्वतीताई खासने यांनी या प्रकरणी नावानिशी तक्रार केली असतानाही वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने सानंदा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला असून, तो तात्काळ स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी आपल्या पत्रात केली आहे. राजीनामा दिला असून, आज त्यांनी अधिकृतपणे याची माहिती माध्यमांना दिली. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
सानंदा हे गेली चार दशके काँग्रेसच्या कार्यात सक्रीय होते. पक्षनिष्ठा राखून त्यांनी संघटन बळकट करण्यासाठी तन-मन-धनाने योगदान दिले होते. पक्षानेही त्यांना विविध जबाबदाऱ्या देऊन गौरवले होते, असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.
मात्र, गेल्या काही काळात पक्षातील अंतर्गत गटबाजी, दुर्लक्ष आणि अनुशासनहीनतेमुळे सानंदा नाराज होते. विशेषतः २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी कारवाया करून भाजपच्या उमेदवाराला मदत केली. या व्यक्तींनाच २६ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या सद्भावना संकल्प सभेची जबाबदारी देण्यात आली. खामगाव शहर काँग्रेसच्या अध्यक्षा सरस्वतीताई खासने यांनी या प्रकरणी नावानिशी तक्रार केली असतानाही वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने सानंदा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला असून, तो तात्काळ स्वीकारावा, अशी विनंती त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button