♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

युद्ध झाल्यास आम्ही भारताच्या बाजूने…! पाकिस्तानातल्या एका राज्याने अळवला फुटीरतेचा सूर

MH 28 News Live : काश्मीर मधील पायल काम येथे झालेल्या आतंकवादी ्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या संभाव्य युद्धापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानमध्ये अंतर्गत फूट पडल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तनख्वामधील इस्लामिक धर्मोपदेशकानं मोठं वक्तव्य केलं आहे. जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही पश्तून लोक भारतासोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पश्तून लोक पाक सैन्याविरूद्ध भारतीय सैन्याला साथ देतील असं या धर्मोपदेशकानं म्हटलं आहे.

दुसरीकडे इस्लामाबादच्या लाल मशिदीमधील एका मौलानानं देखील असंच वक्तव्य केलं आहे. पाकमध्ये जितका मुस्लिमांचा छळ होतो, तितका भारतात होत नाही. भारतासोबत युद्ध लढायला कोण कोण जाणार? असा सवाल या मौलानानं मशिदीमध्ये केला होता, तर मशिदिमध्ये उपस्थित असलेल्या एकानंही हात वर केला नाही. इस्लामचं युद्ध नसल्यामुळे कोणीही हात उंचावले नाही, असं म्हणत या मौलवीनं पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे.

दरम्यान दुसरीकडे मात्र तुर्कीनं पाकिस्तानला उघड पाठिंबा दिल्याचं आता समोर आलं आहे. तुर्कीच्या नौदलाचं जहाज कराचीमध्ये दाखल झालं आहे. हे जहाज सद्भावना म्हणून पाकिस्तानला आल्याचा दावा पाककडून करण्यात येत आहे. मात्र सध्या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129