♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बाबासाहेबांना ‘ आंबेडकर ‘ बनवणारे शिक्षक कोण होते ?

MH 28 News Live : पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले आडनाव देणारे सातारा येथील प्राथमिक शाळेतील ब्राह्मण शिक्षक कृष्णाजी केशवराव आंबेडकर यांची फोटो सहीत माहिती प्रथमच उजेडात आणण्याचे काम आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक, साहित्यिक, दलित पँथरचे सहसंस्थापक ज.वि.पवार, मुंबई यांनी ‘बाबासाहेबांच्या चरित्र लेखनातील उणीवा’ या ग्रंथात केले असल्याची माहिती आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर झिंब्रे यांनी दिली.

ज. वि. पवार यांच्या ‘बाबासाहेबांच्या चरित्र लेखनातील उणीवा’ या ग्रंथाचे प्रकाशन रविवारी 26 जून रोजी सकाळी 11 वाजता राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या हस्ते होत आहे. डॉ. बाबासाहेब सन 1900 ते 1904 या कालावधीत राजवाड्यातील सातारा हायस्कूलमध्ये शिकले त्या सध्याचे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर बोलताना दिनकर झिंब्रे यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सातारा येथील प्राथमिक शाळेतील पहिले गुरुजी कृष्णाजी केशवराव आंबेडकर यांच्या पुर्वजांचे मूळ नाव मुळ्ये व मूळगाव वांद्री हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात आहे. पेशवाईच्या काळात त्यांना त्याच तालुक्यातील आंबेड (खुर्द) गावची सनद मिळाल्याने ते आंबेड येथे स्थायिक झाले. तेथील शाळेत कृष्णाजी सातवी (व्हर्नाक्युलर)पास झाले नंतर त्यांची सातारा येथील लष्करी (सॉल्वेशन आर्मी) शाळेत नेमणूक झाली. या शाळेत जातपात नव्हती. या गुरुजींचे बाबासाहेबांवर जीवापाड प्रेम होते. गावावरुन नाव लावण्याच्या प्रथेप्रमाणे गुरुजींनी आंबेड गावावरुन आपले आडनाव मुळ्ये ऐवजी आंबेडकर लावले.

बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावचे. त्यांनी बाबासाहेबांचे आडनाव आंबडवेकर लावण्याचे ठरवले. हे आडनाव लावण्याऐवजी माझे आंबेडकर नाव लावा अशी विनंती गुरुजींनी केली. ती बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजीबाबांनी मान्य करुन शाळेत भीवा रामजी आंबेडकर अशी नोंद केली आहे. प्रतापसिंह हायस्कूलच्या दप्तरात बाबासाहेबांच्या मोडी भाषेतील सहीनिशी ही नोंद आहे. याबाबतची माहिती प्रथमच उजेडात आणण्याचे काम ज.वि.पवार यांनी ‘बाबासाहेबांच्या चरित्र लेखनातील उणीवा’ या ग्रंथात केले असल्याचे दिनकर झिंब्रे यांनी सांगितले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129