♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जिल्ह्यात ३.५४ लाख आयुष्मान ई कार्ड. पाच लाखांपर्यंत मोफत उपचार

MH 28 News Live, बुलडाणा : आयुष्मान भारत योजनेंतर्गत मोफत वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील ३.५४ लाख लाभार्थीनी ई-कार्ड काढले आहेत. यात अजून ४ लाख ३९ हजार ७१८ लाख लाभार्थ्यांचे ई-कार्ड काढण्यात येणार आहे.

आयुष्मान भारत योजनेत गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, याकरिता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रितरित्या आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. यात वर्षाला एक लाखापर्यंत उत्पन्न असल्यास १ हजार २०९ आजारांवर पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्वेक्षणातून जिल्ह्यातील लाभार्थ्याची जनआरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी ७ लाख ४५ हजार १९१ लाभार्थी पात्र ठरले आहेत.

आजपर्यंत ३ लाख ४५ हजार ७३ लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचे ई-कार्ड, गोल्डन कार्ड काढले आहे. जिल्ह्यातील २ हजार ९ सीएससी केंद्र आणि ८०० आपले सरकार सेवा केंद्रांतून हे ई-कार्ड, गोल्डन कार्ड काढण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. सर्व कुटुंबाला शिधापत्रिकेवरून निवडक गंभीर १ हजार २०९ आजारांवर शस्त्रक्रिया उपचाराची सुविधा नोंदणीकृत खासगी आणि सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत एक लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लाभार्थीला पाच लाख रुपयांचे विमा कवच आहे.

ई-कार्ड काढण्यासाठी आयुष्मान भारत पत्र, रेशन कार्ड आणि आधारकार्ड ही कागदपत्रे घेऊन सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे लागणार आहे. स्वतःच्या मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला दिल्यानंतर ई-कार्ड त्वरित तयार होते. गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना रेशन कार्डनुसार आयुष्मान ई-कार्ड काढता येणार आहे.

योजनेतून जिल्ह्यात २५ रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. यात ५ शासकीय, तर २० खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत ई-कार्ड, गोल्डन कार्ड काढावे. लाभार्थ्यांनी आपले सरकार केंद्र किंवा सीएससी सेंटरवरूनदेखील ई-कार्ड मोफत काढता येणार असल्याचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी कळविले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129